slider slider slider

जनसामान्यांचे नेतृत्व

समाजकारण व समाजसेवा याचं बाळकडू प्यायलेले सुभाष सुरेशचंद्र देशमुख उर्फ बापू हे जिद्द, कष्ट, मेहनत याच्या जोरावर मनुष्य सर्व अडचणी पार करून आपले ध्येय नेहमीच साध्य करू शकतो याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. अतिशय सर्वसामान्य घरातून परंतु कायमच संस्कारी वातावरणात वाढलेल्या बापूंनी समाजकारणाच्या भावनेतून राजकारणात प्रवेश केला. आज ते दक्षिण सोलापूर मतदार संघातून विद्यमान आमदार आहेत व सोलापूरच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील आहेत. मा. श्री. सुभाष सुरेशचंद्र देशमुख म्हणजे जनमानसात आपले विशेष स्थान निर्माण केलेले व्यक्तिमत्व.

सोलापूरच्या मातीमध्ये घडलेले, उद्योग - व्यवसाय, समाजकार्य व राजकारण अशा सर्वच क्षेत्रामधील यशस्वी व खंबीर नेतृत्व म्हणजे सुभाषबापू. सोलापूर विषयी एक व्हिजन घेऊन अविरत कार्यरत असणारे सुभाषबापू भाजपा सरकारच्या कार्यकाळात सहकार, मदत व पुनर्वसन खात्यांचा पदभार सांभाळत असताना महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सदैव प्रयत्नशील राहिले आहेत.


व्यक्तिमत्व ओळख व्हिजन सोलापूर

राजकीय प्रवास

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार मा. श्री. सुभाष सुरेशचंद्र देशमुख उर्फ बापू हे भारतीय जनता पक्षाचे एक वरिष्ठ व प्रमुख सदस्य. मृदुभाषी स्वभाव, संवाद साधण्याची कला, सर्वांना जोडून घेण्याची वृत्ती, संघटन कौशल्य, उत्तम निर्णयक्षमता या गुणांमुळे बापूंना नेहेमीच कार्यकर्ते व जनतेचा विश्वास आणि उत्तम पाठिंबा लाभला आहे.

जानेवारी १९९८

सोलापूर येथे स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषद निवडणुकीत आमदार म्हणून विजयी.

१९९८ सालच्या जानेवारी महिन्यात सोलापूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे जेष्ठ नेते युन्नुसभाई शेख यांचा पराभव करून आमदार म्हणून विजय मिळविला.

२०००

भाजप जिल्हाध्यक्ष.

२००० साली सोलापूर जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली. बापूंच्या समर्थ नेतृत्वाला मिळणारी लोकप्रियता व मजबूत जनाधार पाहता बापूंना पक्षाकडून ही जबाबदारी देण्यात आली.


सोलापूर तरुण भारत अध्यक्ष.

२००० साली सोलापूर तरुण भारतच्या अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली.

२००४

महाराष्ट्र सहकार आघाडी - प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य.

२००४ साली महाराष्ट्र सहकार आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली.


सोलापूर लोकसभा मतदार संघात लोकसभा सदस्य म्हणून विजयी.

२००४ साली लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री व व भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री श्री. सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी सौ. उज्वलाताई शिंदे यांचा पराभव करून लोकसभा सदस्य म्हणून विजय प्राप्त केला.

२००९

माढा लोकसभा निवडणूक.

२००९ साली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदार संघामधून माजी केंद्रीय कृषिमंत्री श्री. शरदचंद्र पवार यांना कठीण लढत देत मोठ्या संख्येने मते मिळविली. बापूंना मजबूत जनाधार मिळत असल्याचेच हे प्रतीक होय.


उस्मानाबाद - तुळजापूर विधानसभा निवडणूक.

२००९ साली विधानसभेच्या निवडणुकीत उस्मानाबाद, तुळजापूर विधानसभा मतदार संघामध्ये कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, माजी दुग्धविकासमंत्री श्री. मधुकरराव चव्हाण यांच्या विरोधात अटीतटीची निवडणूक लढविली.

२०१४

भाजप प्रदेश उपाध्यक्ष - महाराष्ट्र राज्य.

२०१४ साली भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी पक्षाकडून सोपविण्यात आली.


विधानसभा निवडणूक विजयी.

२०१४ साली कॉंग्रेसचे विद्यमान आमदार श्री. दिलीप माने यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करून विधानसभेत आमदार म्हणून विजय प्राप्त केला.

२०१६

महाराष्ट्र राज्य मंत्रिपद.

७ जुलै रोजी महाराष्ट्र राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग खात्यांसाठी कॅबिनेट मंत्री म्हणून पदभार स्वीकारला.

२०१९

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ विस्तार

१७ जून रोजी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये विद्यमान सहकार खात्याच्या प्रभारासह, मदत व पुनर्वसन या खात्यांसाठी कॅबिनेट मंत्री म्हणून पदभार स्वीकारला.


विधानसभा निवडणूक विजयी.

ऑक्टोबर २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार बाबा मिस्त्री यांचा मोठ्या फरकाने पराभव करत विधानसभेत आमदार म्हणून विजय प्राप्त केला.


अधिक वाचा

उद्योग व व्यवसाय

कष्ट, मेहनत यांनीच नशीब साकार होत असते यावर विश्वास ठेवून बापू अखंड कार्यरत आहेत. सोळा वर्षे कंत्राटदारीच्या कामांचा व्यवसाय व त्यानंतर बँक, पतसंस्था, मल्टीस्टेट सहकारी संस्था, साखर कारखाने, दूध डेअरी अशा वित्तीय व औद्योगिक संस्था बापूंनी उभ्या केल्या. एवढा औद्योगिक पसारा वाढल्यानंतरही निस्वार्थी वृत्तीने बापू समाजकार्य व राजकारण यांसाठी झटत आहेत.

मोठ्या मेहनतीने उभे केलेल्या व स्थिरसावर झालेल्या या विविध उद्योग व व्यवसायांची धुरा जबाबदार व सक्षम खांद्यांवर सोपवून, कोणताही स्वार्थ न ठेवता बापूंनी आपले जीवन संपूर्णतः समाजकार्य व राजकीय कार्यासाठी वाहून घेतले आहे.

अधिक वाचा
section9

सामाजिक योगदान

बापूंच्या सामाजिक कार्याचा आढावा शब्दांत मांडणे तसे कठीणच. समाजाचा संपूर्ण विकास साधण्यासाठी समाजातील सर्व घटकांचा विकास झाला पाहिजे हे बापूंचे ठाम मत. शिक्षण, आरोग्य, जल संधारण, वृक्ष लागवड, ज्येष्ठ नागरिकांना आधार, सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा यांसारख्या अनेक कार्यांद्वारे शहरी भागाबरोबरच प्रत्येक गाव, प्रत्येक खेड्यातील सर्व घटकांचा विकास घडवून आणण्यासाठी बापू सदैव प्रयत्न करित आहेत.

छायाचित्रे






व्हिजन सोलापूरमध्ये सहभागी होण्यासाठी व आपल्या प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी येथे संपर्क करा.